“दाट चिंतनात असं वारंवार शिरणं म्हणजे कोण्या अज्ञाताचं कर्ज फेडण्याचाच प्रकार. अशा गुंगलेल्या अवस्थेत खऱ्या जाणिवा सामोऱ्या येतात. आधीच्या नंतरच्या संधिप्रकाशात त्यांचे पदर घेतलेले अपुरे चेहरे भेसूर दिसू दे, स्वा वाईट नाही आहेत. त्यांचं माहेर कुठेतरी नभोमंडलात ईथराच्या वरच्या कृष्णद्रव्यात असतं. जाणिवा असणाऱ्या आपल्या सगळ्यांच्या मेंदूवर जागेपणी कुठलं तरी अज्ञान काम करत असतं. मुंग्या वारुळाबाहेर सगळ्या सर्वकाळ कुठे दिसतात? पण आत त्यांचं किती मोठं साम्राज्य असतं? आणि त्यांच्या सगळ्यांच्या सरळमार्गी एकचित्त हटवादी हालचालींवर कुठल्यातरी आंधळ्या निष्ठेच एक अदृश्य नियंत्रण असतं, ते कोणाला दिसतं? तुझ्या जाणिवांचं हे प्रचंड वारूळ जमिनीत किती खोल आहे, हे पाहा.” EmotionsThought Book:हिंदू Source: हिंदू